समाजाला सशक्त बनवण्यासाठी सर्व समाज घटकांचे आरोग्य उत्तम राखणे आवश्यक असते. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जाते. या योजनेअंतर्गत आजवर हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. बेताची आर्थिक परिस्थिती हा उपचारांमधील अडसर ठरू नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट संचालित “लोकमंगल जीवक हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र” या हॉस्पिटलची स्थापना केली गेली. येथे गरजूंवर नाममात्र शुल्कामध्ये उपचार केले जातात.

